पुनर्जन्माचं  सत्य
भयकथा संपादक Updated: 15 April 2021 07:30 IST

पुनर्जन्माचं सत्य : हिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचे कारण

पुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .

पश्चिमेकडील सभ्यतेमधील पुनर्जन्म   कला क्षेत्रात

हिंदू , एका जीवाने अनेक जन्म घेण्याची प्रक्रियेची कित्येक कारण सांगतात . 
१. आपल्या कर्माची फळ भोगण्यासाठी : दुसरा जन्म घेण्याचे हे एक सगळ्यात प्रमुख कारण आहे . सलिक कर्माची फळ म्हणून माणसाला स्वर्ग मिळतो . राजस कर्माच फळ म्हणून 

मृत्युलोक प्राप्त होतो आणि तामस कर्माच फळ म्हणून पाताळात जावं लागतं . 
२. आपल्या इच्छा पूर्तीसाठी : जेव्हा व्यक्ती भोग आणि विलासाचा शौकीन होतो तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी त्याची वासना तीव्र होते . ती आपली लालसा पूर्ण करण्यासाठी जीवाला 

नवीन शरीर घेण्यासाठी मजबूर करते . 
३. आपली अर्धी साधना पूर्ण करण्यासाठी : जेव्हा एखादा व्यक्ती मोहापासून सुटण्यासाठी अध्यात्मिक प्रयत्न करत असते आणि ते मिळवण्याआधीच मृत्यू आला तर तो जीव आपली 

साधना पूर्ण करण्यासाठी दुसर्या शरीरात प्रवेश करतो . 
४. कर्ज उतरवण्यासाठी : जेव्हा एखादा  जिवाच दुसर्यावर कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो . तेव्हा जीव एक नातेवाईक , मित्र किंवा शत्रू बनून 

जन्म घेतो . 
५. कोणत्यातरी महान आत्म्याने दिलेल्या शापाचा त्रास सहन करण्यासाठी : कोणत्याही व्यक्तीच घोर पाप एखाद्या देवाच किंवा कृषीच्या प्रकोपाला आमंत्रित करू शकतं . त्याचं फळ 

म्हणजे जीवाला आणखी एक जन्म घ्यावा लागतो , जो मनुष्य रूपातच असेल असं नाही . 
६. मोक्ष प्राप्तीसाठी : देव किंवा कोणत्याही गुरूच्या कृपेने जीवाला नवीन शरीर मिळतं ज्यामुळे तो मोक्ष प्राप्त करू शकेल . 
. . .