अगम्य (गूढ कथा)
Nimish Navneet Sonar Updated: 15 April 2021 07:30 IST

अगम्य (गूढ कथा) : शेवट - १२/१२/२००९

कॉम्प्युटर वर अनेक प्रोग्राम एकाच वेळेस रन होत असतात, त्याप्रमाणे मानवी आत्मा हा एक प्रोग्राम मानला तर?

पुन्हा दि: ९/९/२००९, ६:१५, कुलकर्णी क्लासेस  

१२/१२/२००९

सुजय पूर्ण बरा झाल्यावर सुजयचे आई-वडील एका मानसोपचारतज्ञा कडे गेले. घडलेल्या घटनांचा अर्थ विचारयला. ते त्यांचे चांगले मित्र होते. .आईच्या म्हणण्यानुसार गावातल्या एका बाबाने हे आत्म्याचे काम आहे असे सांगितले. मेल्या नंतरचे जग कुणी पाहिलेले नाही. त्यामुळे आत्मे काय करू शकतात, ते मानवाला पूर्ण जाणणे शक्य नाही. मानसोपचार तज्ञ मात्र वेगळेच विष्लेषण करत होते.

ते म्हणाले, " मानवी मन आनि मेंदू हे गूढ आणि अगम्य आहे. विज्ञानाला त्याचे पूर्ण कोडे अजून उलगडलेले नाही. पण या घटनेचा अर्थ आपण असा लावू शकतो की खूप काही करायचे राहीले असतांना अचानक अकस्मात आघात होवुन मृत्य झाला तर ते मन मानायला तयार होत नाही. आत्मा हा एका वेळी अनेक रुपे घेवू शकतो. एकच रुप अनेक वेळा घेवू शकतो. आजच्या युगाच्या भाषेत सांगायचे झाले तर, कॉम्प्युटर वर अनेक प्रोग्राम एकाच वेळेस रन होत असतात. त्याला आपण मल्टि-टास्कींग म्हणतो. कॉम्प्युटर हाच मुळात आपल्या शरिर रचनेच्या आधारे विचार करुन मानवानेच बनवला आहे. तेच मानवी मेंदू (सीपीयू) बाबत होते. मेंदू ची शक्ती आपण फक्त दहा टक्केच वापरतो. पूर्ण वापरल्यास काही अगम्य गोष्टींचा उलगडा आपल्याला नक्की होईल. कदाचीत, मेंदू उर्वरीत शक्ती मृत्युनंतरच्या "जीवना" साठी वापरत असावा...."

आजही सुजय त्या सगळ्या घटनांना आठवून हादरतो. चारही ठीकाणी एकाच वेळेस तो होता हे खरे होते आणि प्रत्येक ठीकाणी इतर ठीकाणी असल्याचा भास त्याला व्हायचा. पण त्या घटनेनंतर सुजय ला तसे नेहेमी घडायला लागले. कारण तो जेव्हा मृत्युच्या दाढेतून परतला तेव्हा कुणीतरी प्रकाशमान व्यक्ती त्याला भेटल्याचे त्याला पुसटसे आठवते. आता तीव्र इच्छा व्यक्त केल्यावर तो हव्या त्या ठीकाणी असतो आणि प्रत्येक ठीकाणी त्याला इतर ठीकाणी तो काय करतोय त्याची स्मृति सुद्धा राहाते....
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य आहे...

. . .